लेखक – आनंद यादव
प्रकाशन – मौज प्रकाशन गृह
पृष्ठसंख्या – १४८
मुल्यांकन – ३.९ | ५
आनंद यादव यांच्या झोंबी मुळे ते सर्वत्र परिचित आहेत, पण तसेच त्यांची ग्रामीण लेखनशैली आणि त्याला असणारा निसर्गाचा समतोल आधार आपल्याला सामोर वेगळी दुनिया उभी करतो. गोतावळा ही एक कथा आहे. एका गावातील बदलत जाणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल होताना, माणसांची विचारसरणी बदलत असताना त्याचा मुक्या जनावरांवर होणारा परिणाम, त्यामुळे बदलत जाणारं समीकरण आणि त्यातून हळू हळू बदलत चाललेली आपली संस्कृती याची एक छान उजळणी होते.
आपल्याला आता शहरी जीवनपद्धती माहीत आहे, आणि ग्रामीण भागातील बदलामुळे आपण तिकडेच जात आहोत. गावातील लोक शेती आणि सोबतच अनेक बारीक जोड उद्योग करतात. मग त्यात कोंबड्या, गुरे असे अनेक भाग आले. अशाच एका गावातील एका मालकाच्या रानात काम करणाऱ्या, नारबाची ही कथा. दावणीला गुरं पुरणार नाहीत तेथपासून ते आता संपुर्ण गोठा रिकामा, अशी अवस्था. वाढत्या शहरीकरणामुळे, नवनवीन तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती मुळे रानातील गुरांची गरज कमी होत चालली. त्यांच्यावरची माया कमी झाली आणि आता सर्च उदास जीवन बनत जात आहे, अस वाटून दुःख झालेला आणि मनोमन दुर्बळ झालेला नारबा ही गोष्ट सांगतो.
पुस्तकातील ग्रामीण भागातील वर्णन, भाषा, आणि त्याच सोबत शेतातील आणि गुराढोरांची अनेक बारीक सारीक माहिती यामुळे हे पुस्तक आजुन फुलते. एकच कथा आणि काही प्रमाणात त्याच गोष्टी सतत घडत असल्यामुळे मध्येच कुठेतरी नकोशी वाटू लागणारी कथा, शेवट मात्र नारबाच्या होणाऱ्या घुसमटीने वेगळेच वळण घेईल असे वाटते. मालक, नारबा, ड्रायव्हर, आणि सोबतची सारी जनावरं, कोंबड्या यामुळेच पुस्तकं खुलते. एक सरळ आणि साधी कथा आपल्याल अनुभवायला मिळते आणि त्यातील अनेक ग्रामीण बरकाव्यांनी आपल्याला नवीन गोष्टी समोर येतात.
हे पुस्तक सर्वांना आवडेलच अस नाही, आवडीनुसार आणि त्यातही ज्यांना ग्रामीण भाग आणि तशीच भाषा जाणून घ्यायची आहे, गाईगुरांची आणि गावातील बदलाची प्रक्रिया समजून घ्यायची असेल त्यांनी नक्कीच हे पुस्तक वाचाव. मला आवडलच, तुम्हाला कसं वाटलं हे पुस्तक ते मला नक्की कळवा!
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ